👉 आक्रोश बळीराजाचा.
मारोती अक्कलवाड पा सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 26 जुलै 2022
भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 80 ते 85 % शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत.
पण बळीराजाविषयी नियतिचा खेळ हा दरवर्षी काहीसा वेगळाच असतो. शेतात राबराब राबुन शेवटी ईश्वराने जेवढं दिलं त्यातच समाधान मानावे लागते तो शेतकरी! अंगावरच्या मळक्या कपडयाकडे न बघता माझं शेत कसं स्वच्छ ठेवता येईल. याकडे त्यांची निस्वार्थ भावना असते. ईमानदारी, प्रामाणिकपणा, सत्य बोलणे, भोळ्याभाबड्या मनाने राहणे, अश्या एक नाही अनेक गुणांनी संपन्न असणारा तो शेतकरीच असतो हो……
शेतात जावं तर शेत पाण्यात आपले प्रतिबिंब पाहतांना दिसते….घरी बसाव तर डोळ्यासमोर संसाराचा गाडा कसा हाकावा. हा प्रश्न जेवतांनी सतत सतावतो आहे.
शेवटी मुखातुन शब्द निघाले हि दुर्दशा पाहवत नाही रे पावसा.
असे भावणीक होवुन शेतकरी आमच्या प्रतिनिधींना सांगत आहेत. कधी कधी त्यांच्या अश्रुंचा बांध देखील फुटत आहे
मायबाप सरकार इंदा तुम्हीच आहात या जगाच्या पोशिंदयाचे मायबाप अशीही आर्त हाक सरकारला आनंदराव पाटील बुटनवाड यांनी मारली आहे.
हेक्टरी पन्नास हजार रुपयाची ताबडतोब आर्थीक मदत देऊन, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी त्यांनी मागणी केली आहे.