ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674
जलंब: येथे छत्रपती शिवाजी महाराज हे ऐक मोठे व नावाजलेले मंडळ आहे या मंडळाची ची स्थापना ही 26/04/1990 साली झाली होती हे मंडळ उभारणी स्व.राजुबाप्पु देशमुख व स्व.शिवहरीभाऊ देवचे यांनी केली व त्यांच्या सोबत त्याचे असंख्य सहकारी यांच्या अतोनात प्रयत्नातुन हे मंडळ चालवले त्यांनी नवदुर्गा उत्सव.शिवजयंती. 26 जानेवारी.15 आगस्ट.पाणपोई राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.असे वर्षा तील प्रत्येक कार्यक्रम उत्साहात पारपाडले ते चौकातील सर्व परिवारांचे सुख:दुख ते वाटुन घेत होते ते दोघे चौकात आले म्हणजे त्यांचे सकारी एक एक करत जमा ह्वायचे आम्ही तेव्हा लहान होतो आम्ही त्यांचा मागे मागे फीरायचो राजु बाप्पु ला आम्ही प्रेमाने नाना म्हणत होतो तेव्हा पासुन म्हणजेच आज 35 वर्षा पासुन राजु बापु. शिवहरीऊ व त्याच मंडळ गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई लावत होते मचिंद्रखेळ येथे जानाईमाता मंदिर आहे दरवर्षी यात्रा असतो असंख्य भावीक भक्त जानाई माता दर्शना साठी जातात त्या निमित्त जलंब रेल्वे स्टेशन येथे पाणपोई लावत आहे आधी आरो पाणी नव्हते ते स्वतहा गावतील पाणी टाक्या जमाकरत होते ट्यांकर ने पाणी आणुन यात्रेकरूना पाणी पाजायचे आजचा हा दिवस आमचा खुप आनंदात जायचा कारण आम्ही लहान मुल पण आवळीने पानपोई व उपस्थिति राहायचो सगळ्या लहान मुलांना नाना कोणत्या ही गाडीत फ्री मधे बसुन द्यायचे आम्ही यात्रा फीरून परत नाना चे नाव सांगुन परत यारचो असे पुर्ण दिवस यात्रेत फीरायचो राजु बाप्पुच असा दरारा होता का त्याना कोनी नाही म्हणायचे नाही आम्ही त्याच्या सहवासात लहानाचे मोठे झालो त्या दोघांनी आम्हाला खुप काही शिकवल परंतु हे नियतीला माण्य नव्हते छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे खरे मानकरी चौकाची आण बान शान असनारे स्व.राजु बाप्पु व स्व.शिवहरीभाऊ देवचे दोघांनाही देवनी आपच्यातुन हीरावुन घेतले त्यांची कमी नेहमी आम्हाला भासतो त्यांनी जे केले ते कोणी करूही शकनार नाही चौकाची शान हरवली पण त्यांचा वारसा परंपरा आजही तुमच्या नावाने शिव+राजे (शिव.शिवहरीभाऊ. राजे राजु भाऊ) असे शिवराजे मित्र मंडळ या नावाने आम्ही चालवत आहे प्रत्येक कार्यक्रम आम्ही त्यांचा फोटो लावुन साजरा करत आहे व करनार तुमच्या बद्दल लिहावे तर शब्द कमी पडतात..!आम्ही तुम्हाला तेवढेच मिस करतो… जनु आजही तुम्ही दोघे या चौकासाठी जिवंतच आहे असे आम्ही समजतो…जय शिवराय..संदीप देवचे.