मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 19 एप्रिल 2025
यावर्षी एप्रिल महिन्यातच भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुका किनवट नदगांव तांडा येथे भिषण पाणी टंचाईला नागरीक सामोरे जात आहे. अवघ्या दहा ते बारा मिनीटे पाणी सोडत असल्यामुळे नळावर महिला ,पुरुष, मुलांची एकच गर्दी होत आहे. लवकरच टॅकरची व्यवस्था करावी. अशी मागणी नदगांव तांडा येथील नागरीकांनी केली आहे.