अकोला/प्रतिनिधी- जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यात गाजीपूर, हिंगणा, शेळद, काळबाई,बाभूळखेड, सहीत ईतरही ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या भूमिहीन लोकांनी महसूल विभागाच्या जमीनीत सन १९० च्या पूर्वीपासून शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेले आहे. दरवर्षी जमीनीची मशागत करुन पिक पेरणी केली जात आहे. पेरणी केलेल्या जमीनीचा पंचनामा, स्थळ निरीक्षणनिरीक्षण, प्रत्यक्ष मोका पाहणी करुन प्रति निवेदनात्मक अहवाल सादर करणे गरजेचे असताना शुध्दा दंडात्मक कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जमीन कब्जा असताना रेकार्डला नोंदी नोंदी नसल्याने सर्व वहितीधारकावर एक प्रकारे अन्याय आहे. त्यामुळे संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानूसार आंदोलनात्मक भुमिका घेवून संस्थात्मक अध्यक्ष भाई जगदीश कुमार ईंगळे यांच्या नेहमी नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदणातील मुद्देनिहाय चौकशीचे निर्देश द्या. अन्यथा गाव तिथे आंदोलन करण्याचा ईशारा जगदेव पिराजी हिवराळे यांनी एका निवेनाव्दारे चौकशीचे निर्देश देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. ज्या गावात अतिक्रमण आहे त्या गावातील शेतीसाठी झालेल्या अतिक्रमणाचा पटवारी बोलावून तात्काळ निर्देश अहवाल देण्याची मागणी केली असून वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. गत अनेक वर्षांपासून शेत जमीनीत आहेत. परंतु, रजिस्टर नोंद घेण्याच्या मागणीसाठी गाव निहाय आंदोलनाचे निद्रेश देण्यात आले आहे. अशा असयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे. अतिक्रमणीत
जमीनी वहीती असताना देखील तलाठी यांनी रजिस्टर नोंद घेतली नसल्याने शेतकरी नारज आहेत.
Home Breaking News बाळापूर तालूक्यात गावनिहाय शेतीसाठी झालेल्या अतिक्रमणाचा अहवाल बोलावून दंडात्मक कारवाईचे निर्देश देण्यासाठी...