ग्रामपंचायत सदस्य गैरहजर असल्याने दुसऱ्यांदा पळसपूर येथील ग्रामसभा रद्द….
शिवजयंतीला ही काही सदस्यांची दांडी, ग्रामसेवक ही करतात कामचुकारपणा….
अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी /-
देशाचा विकास साधायचा असेल तर ग्रामिण भागातील खेड्यांचा विकास साधता आला तरच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला असे म्हणता येईल . परंतू ग्रामिण भागातील खेड्यांचा विकास साधण्यास लोकप्रतिनिधी कमी पडल्याचे प्रमुख्याने दिसून येते . खेड्यांचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत अस्तित्वात असून निवडणुकीच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच, सदस्य हे निवडून येत असतात व त्यांच्याकडून गाव पातळीवर विकासकामे करून घेतल्या जाते . प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाकडून ग्रामसेवकाची नेमणूक केली जाते . ग्रामसेवक गावाचा विकास साधण्यासाठी महत्वाचा दुवा मानला जातो . परंतू ग्रामसेवकांचा ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्यावर कुठलाही अंकुश नसल्याचे पळसपूर येथे उघडकीस आले आहे.
पळसपूर येथे झाले असे की गवाचा विकास साधण्यासाठी गावचा आराखडा तयार केला जातो. तो आराखडा कसा तयार करायचा यासाठी ग्रामसभेच ३० जानेवारी रोजी आयोजन केले होते. परंतू सरपंच उपसरपंच व एकच सदस्य हजर असल्याने ग्रामसभा रद्द करावी लागल्याने ग्रामसभेला आलेल्या ग्रामस्थांचा हिरमुड झाला होता. ती ग्रामसभा रद्द झाली असल्याने ग्रामस्थांनी पुन्हा ग्रामसभा घेण्याची मागणी केल्याने ग्रामसेवक व सरपंच यांनी २४ फेब्रुवारी रोजी ग्रामसभेच आयोजन केल होत. परंतू सदस्यांना याच कुठलही गांभीर्य नसल्याचे त्यांच्या गैरहजेरी मुळे दिसून आल्याने दुसऱ्यांदा ग्रामसभा रद्द करावी लागल्याने ग्रामस्थांचा पुन्हा एकद हिरमोड झाला आहे. सदस्यां बरोबर पोलिस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, वायरमन हे देखिल अनुपस्थित होते
गावामध्ये ग्रामसभा होऊ द्यायची नाही व यातून गावाचा विकास होऊ द्यायचा नसल्यानेच ग्रामभेत सदस्य गैरहजर असल्याचे ग्रामसभेला आलेल्य नागरिक ग्रामसभेच्या वेळी बोलत होते. त्याचबरोबर ग्रामसेवकही कामचुकारपणा करत असल्याचे नागरिकांनी ग्रामसभेच्यावेळी सांगितले आहे. कारण ग्रामसेवक शिरारपल्लू महिन्यातून एक ते दोन दिवसच गावात येतात व कोणालाही न भेटता निघून जातात. फोन केला तर उचलत नाहीत, त्यांना भेटण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामसेवक शिरारपल्लू यांना गावातील नागरीकांच्या समस्यांचे काहीच देणेघेणे नाही यांना केवळ नागरिकांना वेठीस धरण्याचे माहित असल्याचे देखिल नागरीक बोलत होते.
दुसऱ्यांदा ग्रामसभा रद्द झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत मागील झालेल्या कामाचा हिशोब मागितला असता त्यांनी गावात काय काम केली व निधी कुठे खर्च केला हेच ग्रामसेवक शिरारपल्लू यांना सांगता येत नव्हते. तसेच जिल्हा परिषद शाळेतील प्रसाधन गृहाचा मुद्दा देखील चांगलाच गाजला, प्रसाधन गृहाचे काम पूर्ण न करताच गुत्तेदाराने पैसे उचलून घेतले आहे. त्यामुळे शाळेतील प्रसाधन गृहाचा वापर विद्यार्थीनींना व महिला शिक्षीकेला त्याचा वापर करता येत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर शिवजयंतीला देखिल काही सदस्य गैरहजर होते.
ग्रामसभेला गैरहजर असलेल्या सदस्यांवर ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी काय कार्यवाही कारणार याकडे पळसपूर वासियांचे लक्ष लागले आहे