Home Breaking News अवकाळी पावसामुळे हळद उत्पादक शेतक-यांची उडाली तारांबळ.

अवकाळी पावसामुळे हळद उत्पादक शेतक-यांची उडाली तारांबळ.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 27 एप्रिल 2025

नांदेड जिल्हयातील हिमायतनगर तालुक्यात अवकाळी पावसामुळे हळद, ज्वारी, तिळ, आंबा आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बळीराजा वरील संकटाची मालीका अजुन सुरुच आहे. शेतक-यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणारे नगदी पिक हळद पैसे देणारे पिक आहे. हळदी शिजवुन सुकविण्यासाठी टाकली असता.. अचानक शनिवारी रात्री झालेल्या पाऊस, वारा, वादळामुळे हळद उत्पादक शेतक-यांची खुपच फजिती झाली आहे. हळद या पिकाला शासनाने पिमाकवच देऊन शेतक-यांना सहकार्य करावे. अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Previous articleगोदावरी प्रतिष्ठाण नाशिक च्या गोदा स्वच्छता अभियाणाच्या 154 आठवडा प्रसंगी 27 गोदा सेवकांनी काढला तब्बल 1000 किलो कचरा
Next articleपेरकेवाड, पेरकी समाजाच्या बैठकीचे नांदेड येथे आयोजन.