Home Breaking News युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे प्रथम राज्यस्तरीय अधिवेशन डहाणू येथे संपन्न झाले.

युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे प्रथम राज्यस्तरीय अधिवेशन डहाणू येथे संपन्न झाले.

(अजयसिंह राजपूत)युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे प्रथम राज्यस्तरीय अधिवेशन पर्ललाईन बीच रिसॉर्ट डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर येथे दिनांक ११ व १२ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झाले या दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी संस्थापक अध्यक्ष श्री इमरान पठाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन करण्यात आले व त्यानंतर संगठनच्या चर्चासत्राला व परिसंवादाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.अधिवेशनाच्या दुसऱ्या ‘दिवशी दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी मार्गदर्शनाकरीता, चर्चासत्राकरीता व पदाधिकारी व सदस्यांच्या सन्मान सोहळ्याकरीता प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला मा. श्री. सुनीलभाऊ भुसारा ( आमदार विक्रमगड), मा. श्रीमती मनीषाताई निमकर (माजी राज्यमंत्री), मा. श्री प्रवीणभाऊ गवळी (सभापती पं.स. डहाणू), मा. श्री भरतभाई राजपूत (नगराध्यक्ष डहाणू), मा. श्री काशिनाथजी चौधरी (जि.प.सदस्य व माजी बांधकाम सभापती), मा. श्री शैलेशभाऊ करमोडा (जि.प. सदस्य पालघर ), मा. श्री मुकने सर ( उपसरपंच कासा ग्रामपंचायत), मा. श्री विनोद सांगवीकर (वकील मुंबई उच्च न्यायालय) व मा. श्री कमलाकर शेनॉय सर (वरिष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते) इत्यादी मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.

यावेळी संगठनचे सचिव श्री पुरुषोत्तम सदार व सदस्य श्री सुधीर लाडझरे यांनी अधिवेशनाचा उद्देश व संगठनचे कार्य व त्याकरीता अधिवेशनाची आवश्यकता आपल्या प्रास्ताविक मधून व्यक्त केली, यानंतर संगठनच्या सर्व पदाधिकारी व सभासदांचा स्वागत समारंभ घेण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात संगठनच्या माध्यमातून ग्रामविकासाची जनजागृती व चळवळ उभारून भ्रष्ट्राचाराविरुद्ध लढा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र देऊन व जिल्हा संगठनला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.माहिती अधिकार कायद्याचा वापर, तक्रार किंवा निवेदनाचा शेवटपर्यंत पाठपुरावा, ग्रामपंचायतविषयी कायद्यांचा अभ्यास व संगठन वाढीसाठी उपाययोजना यासर्व विषयावर श्री डॉ सतीष बोढरे (धुळे जिल्हाध्यक्ष), श्री हारुन शाह (मुख्य कार्यकारीणी पदाधिकारी), श्री रोशन पुनवटकर ( नागपूर जिल्हाध्यक्ष) श्री राजेंद्र निकम (जळगाव जिल्हाध्यक्ष) व श्री सुनिल कदम (सातारा जिल्हाध्यक्ष) यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर अॅडव्होकेट मा. श्री विनोद सांगवीकर व मा. श्री कमलाकर शेनॉय सर यांनी सभासदांनी विचारलेल्या कायदेशीर अडचणी संबंधित प्रश्नांची उत्कृष्ट प्रकारे उत्तरे दिली व कायदेशीरपणे आपला ग्रामविकासाचा लढा कसा लढता येईल याबाबत योग्य मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक सभासदान आपले सगठन व कार्य या विषयावर मनोगत व्यक्त केले.शेवटी अधिवेशनाच्या समारोपीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री इमरान पठाण (संस्थापक अध्यक्ष युवाशक्ती संगठन महाराष्ट्र राज्य) यांनी संगठनच्या माध्यमातून ग्रामपंचायत कारभाराची व योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून ग्रामविकासाची चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कशी पोहचविता येईल याबाबत मार्गदर्शन केले व संगठनच्या माध्यमातून भ्रष्ट्राचाराविरुद्ध लढा उभारुन संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामविकास घडवून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांना प्रतिज्ञा दिली.
या दोन दिवसीय भव्य-दिव्य अधिवेशनाचे आयोजन पालघर जिल्हाध्यक्ष श्री समशेरभाऊ माणेशिया यांच्या मार्गदर्शनात युवाशक्ती ग्रामविकास संगठन पालघर जिल्ह्याने केलेले होते. या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते, संपूर्ण अधिवेशनाच्या संचालनाची जबाबदारी श्री शेकडे सर यांनी पार पाडून अधिवेशनाची शोभा वाढविली.

Previous articleपरमेश्वर मंदिर कमान ते रेल्वेगेट रस्त्याची दयनीय अवस्था!
Next articleथेट….❤️ ह्रदयातुन