👉 सरकार कर्जमाफी करत नसल्याने शेतक-यांची भावनिक पोष्ट व्हायरल!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 01 एप्रिल 2025
कृषिप्रधान भारत देशात अन्नदाता, बळीराजा , जगाचा पोशिंदा अशा नुसत्या उपमा देऊन शेतक-यांची चेष्ठा करते आहे..कारण कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन सरकारने शेतक-यांना फसविले आहे. निवडुणीपुर्वी एक नाही हजारो आश्वासन देऊन बळीराजाची निवडणुकीत मते घेतली. पण शेतकरी आणी शेतमजुर दोघांनाही फसविले अशी भावनिक पोष्ठ शेतक-यांनी टाकली आहे. गुढीपाडवा निमित्त शेतात तास करुन काळया आईच्या पायावर आपले मस्तक ठेवत ते पोष्ठमध्ये म्हणाले.. आम्हाला सरकारने फसविले आहे. शेतकरी आणी शेतमजुर दोघांनाही तुझ्या कृपेने कर्जमुक्त करं….लिंडसे कोटी जनतेसाठी अन्न पिकविणारा शेतकरी आज सरकारच्या नजरेत *गुलाम* म्हणुन जगतो आहे. शेतमालाचा भाव पाडुन आमचे सन्मानाने जगणे हिरावुन घेतले आहे.सन्मानाने जगण्याचा आम्हा शेतक-यांचा अधिकार मान्य व्हावा. हाच तुझा आशिर्वाद आम्हा शेतक-यावर राहु दे. अशी सरकार प्रति भावनिक पोष्ठ एका शेतक-यांने टाकली आहे.