Home Breaking News सततच्या मुसळधार पावसामुळे जनजिवण विस्कळीत..

सततच्या मुसळधार पावसामुळे जनजिवण विस्कळीत..

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 30 में 2025

हिमायतनगर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासुन सतत मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे चक्क नदी, नाले , ओढे तर पुर्णपणे भरून वाहत होते. त्यामुळे शेतक-यांची शेतीच्या कामाला तर ब्रेकच बसला आहे. सततच्या पावसामुळे जमिनीच्या मशागतीची कामे थांबली आहेत. त्यामुळे मृग नक्षत्रात शेतीमध्ये पेरणीची लगबग असते..परंतु ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी प्रचंड शेतीचे नुकसान होत आहे. जिल्हाअधिकारी नांदेडव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी या अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतक-यांनी पेरणी करु नये. पेरणी केल्यास किड व रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर दिसुन येतो. असा संदेश दिला आहे..

👉 सहस्त्रकुंड धबधबा खळखळुन वाहतो आहे.

किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा या अवकाळी पावसामुळे नदीला पाणी आल्यामुळे खळखळुन वाहतो आहे. या अवकाळी पावसामुळे अनेकांची घरे गळत आहेत. नालीची घाण रस्त्यावर येऊन दुर्गधी पसरली आहे. एकंदरीत अवकाळी पावसामुळे जनसान्य नागरीकांचे जिवंण विस्कलीत झालेले आहे..

Previous article वैवाहिक आयुष्याची नांदी : संस्कृती- रिती रिवाज व पंरपरे च्या उंबरठ्यावर समन्वयाची क्रांती!
Next articleरेल्वे प्रवाशांनो विनातिकीट प्रवास महागात पडणार…