भास्कर भोजने यांचे प्रतिपादन….
महाराष्ट्रात क्षीण झालेली कॉंग्रेस स्वतःच्या बळावर भाजपला पराभूत करु शकते का..???
क्षीण झालेली कॉंग्रेस यासाठी म्हटले की, लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला १६% मते मिळाली आणि ४८ पैकी केवळ १ जागा निवडून आणता आली होती…!!
एकेकाळी महाराष्ट्रात एकहाती सत्ता कॉंग्रेस पक्षाची असायची, महाराष्ट्र हा कॉंग्रेस पक्षाचा मजबूत गड होता, त्या कॉंग्रेस पक्षाला ४८पैकी १ जागा मिळणे म्हणजेच महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाला शेवटची घरघर लागली आहे असे म्हणायला हरकत नसावी…!!
मविआ मुळे आमची ताकद वाढली असे कॉंग्रेस पक्षाला वाटतं असेल तर कॉंग्रेस पक्षाने त्या भ्रमातून बाहेर पडावे…!!
मविआ मधील शिवसेना पक्ष फोडून भाजपने शिवसेनेचे खच्चीकरण केले आहे, शिवसेना अस्तित्वासाठी झगडतं आहे हे कुणीही सुज्ञ मान्य करेल म्हणून ते कॉंग्रेस पक्षाने सुद्धा मान्य केले पाहिजे…!!
जेलवारी टाळायची म्हणून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजरोजी भाजपसोबत आहे…!!
संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यासाठी की, पक्षप्रमुख शरद पवार साहेब स्वतः सांगत आहेत की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली नाही, त्याचा अर्थ समजून घ्यावा, अजित दादा पवार आणि शरद पवार साहेब यांच्या सातत्याने होतं असलेल्या ऊघडं आणि गुप्त भेटीतून अर्थ समजून घ्यावा, उद्योगपती गौतम अडाणी सोबतच्या शरद पवार साहेब यांच्या बैठकीचा अर्थ समजून घ्यावा…!!
मविआ ला भाजपने पोखरुन खिळखिळे केले आहे हे सत्य कॉंग्रेस पक्षाला ऊमजले असेल तर महाराष्ट्रात भाजपला पराभूत करणारं कसे? आणि कुणाच्या बळावर…???
मविआ, मविआ म्हणून भ्रमाचा भोपळा दाखवून भाजपला पराभूत करता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे…!!
महाराष्ट्रात निळा झेंडा सोबतं घेतल्याशिवाय आंबेडकरी मतदान मिळतं नाही म्हणून प्रत्येक निवडणुकीत एक तरी रिपब्लिकन गट सोबतं घेऊन उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीवर निळा झेंडा लावायचा आटापिटा प्रस्थापित राजकीय पक्ष करीत आलेले आहेत…..!!
आजरोजी संपूर्ण आंबेडकरी मतांची ताकद वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठिशी एकवटलेली आहे. त्याचे उदाहरण म्हणजे २०१९ च्या लोकसभेत वंचित बहूजन आघाडीने ४६ लाख मते घेतली होती.आणि सात लोकसभा मतदारसंघात कडवी टक्कर दिली होती आणि औरंगाबाद लोकसभा मित्र पक्षाला जिंकून दिली होती ही निर्णायक ताकद महाराष्ट्रातील लोकसभेचे निकाल बदलवू शकते.त्याचा पुरावा म्हणजे १९९८ साली कॉंग्रेस आणि भारिपबहुजन महासंघ यांची युती झाली होती, १९९६च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला महाराष्ट्रातील ४८ पैकी केवळ १५ जागा जिंकता आल्या होत्या १९९८ साली कॉंग्रेस पक्षाने भारिपबहुजन महासंघांसोबतं युती केली आणि कॉंग्रेस पक्षाचे ३३ खासदार निवडून आले होते हा इतिहास आहे…!!
महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाचे १५ चे ३३खासदार करण्याची ताकद अॅड प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आहे हा अनुभव कॉंग्रेस पक्ष विसरला काय..???
I. N. D. I. A. नावाची आघाडी बनविली म्हणून महाराष्ट्रात भाजपला पराभूत करता येईल या भ्रमात कॉंग्रेस पक्षाने वागू नये, कर्नाटक मध्ये कॉंग्रेस पक्ष जिंकला म्हणून महाराष्ट्रात ही विजय मिळविता येईल या स्वप्न रंजनात कॉंग्रेस पक्षाने रमू नये…!!
मतदार सुज्ञ झाला आहे आणि प्रत्येक राज्यातील मतदारांनी आपापले प्रादेशिक राजकीय पक्ष अस्मिता म्हणून निवडलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला पराभूत करायचे असेल तर, वंचित बहूजन आघाडी ला सोबतं घेतल्याशिवाय भाजपला पराभूत करताच येणार नाही ही वस्तुस्थिती असतांना कॉंग्रेस पक्षाचे काही महाराष्ट्रातील नेते हवेत तीर चालवून हवेतच राजकारण करीत आहेत ही बाब गंभीर आहे…!!
कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील नेते, जातिय अहंकारामुळे सरंजामी वृत्तीने वागतात का.??? अशी कुजबुज आंबेडकरी मतदारांमध्ये आहे…!!
आदर्श घोटाळा आणि अमर्याद सत्तेच्या उन्मादात काही कॉंग्रेस नेते भ्रष्टाचाराच्या कचाट्यात सापडले म्हणून जेलमध्ये जाण्याला भीत असावे का.???
अशा प्रकारे शंका व्यक्त करीत आहेत…!!
गेल्या ४० वर्षापासून तात्विक राजकारण करणा-या निष्कलंक असलेल्या आणि वैचारिक प्रामाणिकता जोपासणा-या अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना कॉंग्रेस पक्ष महत्त्व देतं नसेल तर कॉंग्रेस पक्ष खरेचं भाजपला पराभूत करु इच्छितो की, केवळ भुई थोपटून बनाव निर्माण करीत आहे…??
वेळ आणिबाणीची आहे, लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे अशावेळी कॉंग्रेस पक्षाने जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे म्हणून कॉंग्रेस पक्षाने खुलासा केला पाहिजे…!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने. :- 9960241375