Home Breaking News कर्मयोगी जेष्ठ नागरिक मंडळाची पाच दिवसीय वसंत व्याख्यानमाला संपन्न

कर्मयोगी जेष्ठ नागरिक मंडळाची पाच दिवसीय वसंत व्याख्यानमाला संपन्न

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युजमो. नंबर – 8983319070

सध्या देशामध्ये कुटुंब व्यवस्था ढासळलेली असून ती पूर्ववत करण्यासाठी जेष्ठांचे योगदान महत्वांचे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेते चिन्मय दादा उदगीरकर यांनी केले ते . तारवाला नगर येथील कर्मयोगी जेष्ठ नागरिक मंडळाच्या पाच दिवसीय वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा गटनेते नगरसेवक जगदीश पाटील हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले चिन्मय उदगीरकर पुढे म्हणाले की

जेष्ठ आणि तरुण यांचा संवाद घरामधून नष्ट झाला आहे यासाठी संस्कारक्षम घर निर्माण होणे गरजेचे झाले आहे यासाठी जेष्ठांनी तरुणांसोबत येऊन राष्ट्रीय हितासाठी कार्य केले पाहिजे याप्रसंगी चिन्मय उदगीरकर यांनी त्यांच्या फिल्मी कला विश्वातील प्रवासातील कडू गोड आठवणी रसिकांसोबत मांडल्या प्रथम पुष्प कै भिकाजी विठोबा नवगिरे यांच्या स्मृतिपत्यार्थ आयोजित केले होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण गायकवाड यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय भालचंद्र सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन शेखर ढेपे यांनी मांडले

कै सचिन अशोक कोतवाल यांचे स्मरणार्थ दुसरे पुष्प मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस व नासिक गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट नितीन ठाकरे यांनी गुंफले

यावेळी श्री ठाकरे म्हणाले की, ज्येष्ठांनी त्यांना असलेल्या सवलती व कायदेविषयक बाबींची माहिती करून घेणे गरजेचे आहे जोपर्यंत आपले हात पाय व्यवस्थित आहे तोपर्यंत आपण आपल्या बँक खात्याला वारस नोंदी करून घ्याव्या व आवश्यक असल्यास मृत्युपत्र सुद्धा करून ठेवावे.

स्मृतीशेष श्रावण पांडुरंग मसदे स्मरनार्थ तिसरे पुष्प गुंफताना,

नाशिक येथील प्रसिद्ध स्री रोग तज्ञ व समाजसेविका डॉक्टर निवेदिता पवार यांनी स्त्रियांचे आजार व आनंदी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी मार्गदर्शन केले. त्यापुढे म्हणाल्या की स्त्रियांनी अधून मधून स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यावे व डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषध उपचार यावे कोणत्याही आजार हा लपवून ठेवू नये तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन त्यावर उपचार करावे व निरोगी जीवन जगावे या प्रसंगी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती हेमलता ताई बिडकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या

चौथे पुष्प के.सतीश माशाळकर यांचे स्मरणार्थ गुंपताना पुणे येथील यशदा या संस्थेचे प्राध्यापक व सेवानिवृत्त अधिकारी श्री शैलेश नाईक यांनी आपत्ती निवारण व युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी रसिकांना मार्गदर्शन केले तर संकट समय कशाप्रकारे आपण सामना करावा याबाबत मार्गदर्शन केले व घरामध्ये असलेल्या निरपयोगी वस्तूंची विल्हेवाट कशी लावावी याबाबत सूचना केल्या समारोपाच्या दिवशी स्मृतीशेष दोधू चिंदा जगताप स्मरणार्थ चौथे पुष्प नाशिक शहरातील प्रसिद्ध अशा गुंजन या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अँथोनी सिल्वस्टर ,विजय तायडे ,सतीश साळवे ,शंकर गांगुर्डे ,श्रीकांत गायकवाड, अरुण गायकवाड आदी कलाकारांनी विविध सदाबहार जुन्या व नवीन गीते सादर करून रसिकांचे मन जिंकले

पाच दिवसीय या व्याख्यान मालेसाठी रसिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी अरुण गायकवाड, नाना कोतवाल, अशोक जगताप, स्मिता माशाळकर, प्रतिभा गायकवाड,राजेश मसदे, शेखर ढेपे ,भालचंद्र सूर्यवंशी, अरविंद ब्राह्मणकर ,कल्पना मोरे डी.एल.पवार, सौ.लता वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleमराठी ऊत चित्रपट कान्स महोत्सवात…
Next articleगोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदी अभिषेक बकेवाड यांची निवड.