👉 रंगपंचमीची लागली चाहुल..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 05 मार्च 2023
” आले निसर्गाच्या मना! तिथे कुणाचे चालेना”
विज्ञानाच्या तंत्रज्ञानवर माणुस सततच्या बदलत्या जिवणशैलीत कितीही बदल घडवत असला तरी, आजतरी निसर्गाच्या किमयापुढे माणसाला झुकावेच लागते.
फाल्गुन शुद्ध चैत्र शुद्ध पोर्णिमेच्या पुर्वसंध्येला शेतातील शेतकऱ्यांचा मित्र आणि आयुर्वेदिक वनस्पती म्हणून
” पळस” या झाडांचे फुले फुलण्यास सुरुवात झाली आहे. निसर्ग प्रेमींच्या मनामध्ये भुरळ पाडणा-या फळस या झाडांचे महत्व पुरविपासुनच सांगितले आहे. लालबुंद फुलांचा गुच्छ सहजच माणसाचे मन आकर्षित करणारा हा पळसाच्या झाडाचे पाने शेतकरी गुढीपाडव्याच्या दिवशी गोड जेवणाला पत्तरवाळी म्हणुन उपयोगात आणले जाते.
वैदिक काळापासून पळसाच्या झाडाला अनन्य साधारण महत्व आहे. असाध्य ते साध्य विकारांवर मात करता येते. इतकेच नाही तर पळसाच्या झाडाचे फुल आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केली तर, शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. आणि शरीराला थंडावा मिळतो. अतिउषणतेचा प्रादुर्भाव होत नाही. पळसाच्या फुलांमुळे मुत्राशयांचे विकास दुर होतात. पळसाच्या फुलांचा काडा तयार करून पिल्यास शरीराला एक एनर्जी मिळते. त्यासोबतच शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
चला तर मग निसर्गाचे रक्षण करु पळस वाचवुया.