———————————–भाजप आणि कॉंग्रेस हे एकमेकांचे कट्टर विरोधी पक्ष आहेत असा प्रचार इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि प्रिंट मिडिया करीत असतो. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. भाजप आणि कॉंग्रेस एकमेकांना पूरक राजकारण करतात. त्याची ठळक उदाहरणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समोर येत आहेत….!!
२०२४ च्या निवडणुकीत भाजपने ४०० पारचा नारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्ष आम्ही ताकदीने भाजपच्या विरोधात लढतो असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होता आणि म्हणून कॉंग्रेस पक्षाने इंडिया आघाडी निर्माण करुन भाजप समोर तगडे आव्हान उभे केले आहे अशी बतावणी मात्र केल्या गेली…!!
प्रत्यक्षात कॉंग्रेस पक्षाने इंडिया आघाडीमध्ये जाणिवपूर्वक काही भाजप विरोधी पक्षांना स्थान दिले नाही आणि मत विभाजन झाले पाहिजे असा पवित्रा घेतला ऊदा. उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात बसपा आणि महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यात वंचित बहुजन आघाडी ला इंडिया आघाडीत स्थान मिळाले नाही.त्यामुळे इंडिया आघाडी मतबुत झाली नाही…!!
इंडिया आघाडी मजबूत तर झाली नाहीच परंतु कॉंग्रेस पक्षाने पं. बंगाल,दिल्ली,केरळ सारख्या राज्यात तृणमूल कॉंग्रेस,आप आणि डावे पक्षाच्या विरोधात उमेदवार उभे करून. मतांचे विभाजन करून कॉंग्रेस पक्ष अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करीत आहे…!!
तिसरी बाब म्हणजे कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आयकॉन नेते राहूल गांधी यांनी त्यांच्या कुटूंबाचा परंपरागत असलेला मतदारसंघ “अमेठी” सोडून दिला आणि भाजपच्या स्मृती इराणी समोरुन पळ काढला. ही भुमिका लढण्याची नसुन पळून जाण्याची आहे त्यामुळे जनतेच्या मनात कॉंग्रेस पक्षाबद्दल चुकीचा मेसेज गेला….!!
चौथी आणि अतिशय गंभीर बाब म्हणजे देशातील वेगवेगळ्या राज्यात कॉंग्रेस पक्षाने भाजपला निवडून येण्यासाठी प्रत्यक्ष मदत करायला सुरुवात केली आहे….!!
गुजरात मधील सुरत लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेऊन भाजपचा अविरोध खासदार निवडून दिला…!!
राजस्थान मध्ये “उदयपूर” लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस च्या उमेदवाराने अर्ज मागे घेऊन भाजप च्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे…!!
मध्यप्रदेश मध्ये “इंदौर” आणि “खजुराहो” या दोन मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेऊन भाजप ला पाठिंबा दिला आहे…!!
ऊडिसा या राज्यात “पुरी” लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी अर्ज वापस घेऊन भाजप ला पाठिंबा दिला आहे…!!
महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाने जाणिवपूर्वक काही मतदारसंघात कमजोर उमेदवार देऊन भाजप सोबतं छूपी युती करून मॅच फिक्सिंग केली आहे…!!
निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करुन मोकळे झाले आहेत. आणि काही जण निवडणूक झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणारं आहेत…!!
सातारा, लातूर, सोलापूर मधील कॉंग्रेस पक्षाचे दिग्गज नेते भाजपमध्ये जाण्याच्या खात्रीलायक बातम्या आहेत तर शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू अभिजित पाटील यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपचे काम करीत असल्याचे जाहीर केले…!!
एकंदरीत भाजपचे ४००+ चे मिशन पुर्णत्वास नेण्यासाठी कॉंग्रेस पक्ष भाजपला कुठं छूपी तर काही ठिकाणी ऊघडं मदत करीत आहे हेच सिद्ध होत आहे…!!
महाराष्ट्रातील तमाम संविधानवादी, सेक्युलर, पुरोगामी,आंबेडकरवादी आणि मुस्लिम बांधवांनो २०२४ च्या निवडणुकीच्या तीन टप्प्यातील मतदान अजून बाकी आहे…!!
कॉंग्रेस किंवा मविआ ला मते देऊन स्वतः ची व समाजाची फसवणूक करुन घेऊ नका…!!
कॉंग्रेस पक्ष देशभर भाजपला मदत करीत आहे आणि भाजपची बी टीम म्हणून काम करीत आहे…!!
मी कॉंग्रेस पक्षावर आरोप करीत नाही, घडलेल्या घटनांचा तपशील दिला आहे, सत्य तेच मांडले आहे. तर्क नाही, अनुमान नाही, आरोप नाही, वस्तुस्थिती आहे…!!
मविआ ला मतं देऊन अप्रत्यक्ष भाजपला मदत होणार आहे याचा सारासार विचार करून मताचा अधिकार वापरा…!!
एक सापनाथ तर दुसरा नागनाथ आहे…!!
एकदा का मतदान संपले की, सत्तेसाठी हे इकडून तिकडे उड्या मारतील तेव्हा मतदारांच्या हातात काहीच नसेल…!!
फसवणूक टाळा आणि सदसदविवेकबुद्धी ने मताचा अधिकार बजावा…!!
महाराष्ट्रात महायुती आणि मविआ च्या विरोधात लढणारा प्रबळ वंचित बहुजन आघाडी हा पर्याय आहे…!!
वंचित बहुजन आघाडी कडे परंपरागत मतदार आहे आणि स्वच्छ चारित्र्याचे सुशिक्षित उमेदवार आहेत…!!
चुकीच्या पक्षाला आणि उमेदवाराला मत देऊन पश्छताप करण्यापेक्षा हक्काच्या वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवाराला मत द्या आणि लोकशाही वाचवा, संविधानाचे संरक्षण करा…!! जयभीम.
@.. भास्कर भोजने.