Home Breaking News लग्नासाठी मुलगी मिळत नाही; संपत्तीत हिस्सा द्या, मुलांची मागणी, वडिलांनी दिला नकार,...

लग्नासाठी मुलगी मिळत नाही; संपत्तीत हिस्सा द्या, मुलांची मागणी, वडिलांनी दिला नकार, अन्…

अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून दोन मुलांनी पित्याकडे संपत्तीत हिस्सा देण्याची मागणी केली. मात्र पित्याने ही मागणी मान्य केली नाही. यानंतर या दोन्ही मुलांनी मिळून धक्कादायक कृत्य केले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बाळापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळापुर तालुक्यातील कसुरा गावातील जितेंद्र ताथोड (४३) यांच्या पहिल्या पत्नीची मुले राम ताथोड आणि बजरंग ताथोड यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांनी घराचा हिस्सा पाहीजे, असे म्हटले असता जितेंद्र यांनी हिस्सा द्यायला नकार दिला. अन् तुम्ही माझे मुलंच नाही, असं म्हणून दोघांना संपत्ती द्यायला विरोध करू लागले. त्यावरून वडील अन् मुलं राम आणि बजरंग यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. या वादा दरम्यान मुलांनी वडिलांवर कोयत्याने डोक्यावर, पाठीवर, चेहऱ्यावर, हातावर, कपाळावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्यानंतर दोघेही मुलं घटनास्थळावरून पळाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जितेंद्र ताथोड़ यांना तातडीने उपचारासाठी अकोल्यात दाखल करण्यात आले.

या प्रकरणात ३२६, ३०७, ४५२, ३४ भादंवि कलमनूसार गुन्हा दाखल करून पुढील तपास उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल ढोले करीत आहेत. राम आणि बजरंग ताथोड हे जितेंद्र ताथोड़ यांच्या पहिल्या पत्नीचे दोन्ही मुले आहेत. जितेंद्र हे त्यांच्या दुसऱ्या लग्नानंतर मुलापासून वेगळे राहतात. आता राम आणि बजरंग हे दोघे वयाने मोठे झाले आणि लग्नाला आल्यामुळे वडिलांकडे संपत्तीतून अर्धा हिस्सा मागण्यासाठी गेले होते. दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून त्यांनी वडिलांवर प्राणघातक हल्ला चढवला. लग्नाचे वय असल्यामुळे मुलीचा हात मागण्यासाठी वडील आपल्या पाठीशी उभे राहत नाहीत याचाही राग या दोघांच्या मनात होता.

Previous article“त्या” गावातील विद्युत पथदिवे महिन्यापासून बंद,रात्रीला असतो रस्त्यावर अंधाराचा काळोख…
Next article* महाराष्ट्रात कॉंग्रेस चा हटवाद भाजपच्या पथ्यावर पडेल…!!